नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो गाडीतून बाहेर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या यादव याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार नवीन Railway मार्ग! 5 स्टेशनं, 3 बोगदे, 47 पुल आणि बरंच काही….; पहा कसा राहणार नवा मार्ग?
- सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! 7 वर्षात पहिल्यांदा असं घडणार की….
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ पिकनिक स्पॉटवर तयार होणार रोप-वे ! 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढवले जाणार का ? सरकारने दिली मोठी माहिती
- दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! देशात लवकरच धावणार ही ट्रेन