नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो गाडीतून बाहेर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या यादव याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचण्याचा संकल्प दिल्ली येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन
- तमाशा कलावंतांसाठी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटणार खासदार नीलेश लंके यांची माहिती
- Ahilyanagar News : अहिल्यानगरला झालेय काय? सिगारेट पाकीट उधार न दिल्याने दुकान पेटविले; दुसरीकडे कोयत्याने सपासप वार
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आता ग्राहकांना…
- Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! आ.रोहित पवार यांना धक्का, आता आ. शिंदे