श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले.
तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी बोलताना केले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक नादंगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

यावेळी सभेला प्रा.तुकाराम दरेकर, रमेश गिरमकर, नानासाहेब झिटे, विठ्ठलराव काकडे, रंगनाथ बिबे,बशिर काझी,गणेश झिटे,महेश खेडकर, दादा शिर्के, विनोद मखरे, अहमदभाई पिरजादे, मच्छिद्र घोधडे, शहाजी खेडकर, दादा गोरे,
मुन्ना ढवळे,कालिदास ननवरे यांच्या सह मान्यवर हजर होते यावेळी बोलताना ॲड. सुभाष डांगे म्हणाले आमच्या गावच्या पोपटांनी एसटी महामंडाचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात चालक वाहक म्हणून नोकरी अमिश दाखवून साडेतीनशे तरुणांना गंडा घालुन लाखो रुपये कमविले.
जो माणूस गावात ग्रामपंचायतीला निवडून आला नाही,असे डांगे म्हणाले. प्रास्तविक माजी सरपंच रोहिदास पवार यांनी करुण अहमद पिरजादे यांनी आभार मानले.
- कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 भारतीय फलंदाज कोणते?, पाहा यादी
- नेट बँकिंगपासून आयटीआर फाइलिंगपर्यंत…पासवर्ड विसरला तरी टेन्शन नाही! ‘ही’ आहे संपूर्ण प्रोसेस, स्टेप-बाय-स्टेप समजून घ्या
- जगातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम्स कुणाकडे?, भारताच्या एस-400 ने मिळवलं अव्वल स्थान! पाहा संपूर्ण यादी
- आषाढीनिमित्त रताळ्यांची आवक वाढली; अहिल्यानगरमध्ये मिळाला प्रतिक्विंटल ३ हजारांपर्यंत भाव
- आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणाऱ्या बीडच्या शेखची थेट तेलंगणातून केली उचलबांगडी