श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले.
तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी बोलताना केले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक नादंगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

यावेळी सभेला प्रा.तुकाराम दरेकर, रमेश गिरमकर, नानासाहेब झिटे, विठ्ठलराव काकडे, रंगनाथ बिबे,बशिर काझी,गणेश झिटे,महेश खेडकर, दादा शिर्के, विनोद मखरे, अहमदभाई पिरजादे, मच्छिद्र घोधडे, शहाजी खेडकर, दादा गोरे,
मुन्ना ढवळे,कालिदास ननवरे यांच्या सह मान्यवर हजर होते यावेळी बोलताना ॲड. सुभाष डांगे म्हणाले आमच्या गावच्या पोपटांनी एसटी महामंडाचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात चालक वाहक म्हणून नोकरी अमिश दाखवून साडेतीनशे तरुणांना गंडा घालुन लाखो रुपये कमविले.
जो माणूस गावात ग्रामपंचायतीला निवडून आला नाही,असे डांगे म्हणाले. प्रास्तविक माजी सरपंच रोहिदास पवार यांनी करुण अहमद पिरजादे यांनी आभार मानले.
- मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
- सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! हजार-लाखोंत नाही तर कोटींमध्ये संपत्ती कमवतात, प्रेमात मात्र…
- भारताची संरक्षण क्षमता गगनाला भिडणार! ‘या’ नवीन स्वदेशी लढाऊ विमानामुळे चीनलाही फुटला घाम, पाहा त्याची क्षमता
- बाबा वेंगांची 2025 साठीची भयानक भविष्यवाणी, ऐकून उडेल थरकाप! यापूर्वीची भाकीतं ठरलीत अगदी खरी, आता नवीन भाकीत काय?
- अहिल्यानगरमधील राष्ट्रीय कबड्डीपटूवर क्रीडा प्रशिक्षकांकडून अत्याचार, दोन क्रीडा शिक्षकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या