श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले.
तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी बोलताना केले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक नादंगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

यावेळी सभेला प्रा.तुकाराम दरेकर, रमेश गिरमकर, नानासाहेब झिटे, विठ्ठलराव काकडे, रंगनाथ बिबे,बशिर काझी,गणेश झिटे,महेश खेडकर, दादा शिर्के, विनोद मखरे, अहमदभाई पिरजादे, मच्छिद्र घोधडे, शहाजी खेडकर, दादा गोरे,
मुन्ना ढवळे,कालिदास ननवरे यांच्या सह मान्यवर हजर होते यावेळी बोलताना ॲड. सुभाष डांगे म्हणाले आमच्या गावच्या पोपटांनी एसटी महामंडाचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात चालक वाहक म्हणून नोकरी अमिश दाखवून साडेतीनशे तरुणांना गंडा घालुन लाखो रुपये कमविले.
जो माणूस गावात ग्रामपंचायतीला निवडून आला नाही,असे डांगे म्हणाले. प्रास्तविक माजी सरपंच रोहिदास पवार यांनी करुण अहमद पिरजादे यांनी आभार मानले.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













