“नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू”

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या समर्थन करण्यासाठी ”अण्णांनी जे आंदोलन स्थगित केलेय, त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो,” असे जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो.६० दिवस झाले तरी शेतकरी आंदोलन सुरू आहे. शांततेत चालू आहे. सरकार हट्टीपणा करतेय. कायदा ज्यांच्यासाठी आणला तेच जर आंदोलन करत असतील, तर ते मानले पाहिजे.

कायदा मागे घेतला तर सरकारचे फार मोठे नुकसान होणार नाही. शेतकरी कायद्याबद्दल शेतकऱ्यांशी बोलायला काही नाही म्हणून मौन बाळगण्याशिवाय पर्याय नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!