Sujay Vikhe Patil: खा. सुजय विखे पाटील यांच्या ‘या’ वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या! भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही?

Published on -

Sujay Vikhe Patil:- सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले असून प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यातच भाजपच्या लोकसभा यादीची प्रतीक्षा आता संपली व शनिवारी संध्याकाळी भाजपने देशातील 16 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये  साधारणपणे 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

यामध्ये 34 केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी तर देशाचे गृहमंत्री अमित शहा गांधीनगर मधून लढणार आहे. परंतु या पहिल्या 195 जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे एकही नाव नाही.

यामागे महायुतीचे जागा वाटप अजून पूर्ण झाले नसल्याचे कारण देण्यात आलेले आहे. परंतु अशातच मात्र अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी जवळ असलेल्या राहता येथे आयोजित एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची एकंदरीत चर्चा सुरू झाली आहे.

 काय म्हणाले खा. सुजय विखे पाटील?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी जवळ असलेल्या राहता येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता व या कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “शिर्डी मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो.

मात्र तुमच्या पासून मी दुरावला गेलो आहे. फक्त आता दोन महिने होऊ द्या नंतर मी कायमचा इकडेच म्हणजे शिर्डीला येईल काळजी करू नका.” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आता या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळामध्ये याबाबत अनेक प्रकारचे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या वक्तव्या मागील अर्थ पाहिला तर त्यांना अहमदनगर मधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही याबद्दल त्यांना काही कुणकुण लागल्याचा परिणाम असू शकतो किंवा त्यांना यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीला निवडून येणार की नाही याबाबत शंका वाटत आहे का असे देखील प्रश्न या माध्यमातून राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहेत.

त्यामुळे आता भाजपकडून त्यांना अहमदनगर मधून लोकसभेचे उमेदवारी मिळणार की नाही याबाबत देखील सांशकता आहे की काय? असे देखील या माध्यमातून चर्चा सुरू झाल्याचे सध्या चित्र आहे.

त्यामुळे आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा कोण उमेदवार असेल याबाबत भाजप काही धक्का तंत्राचा वापर करणार का? याबाबत देखील अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता वाढीस लागलेली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News