नगर – शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले.

स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.
- अहिल्यानगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस, भाजप या तरूण चेहऱ्याला देणार संधी? माजी मंत्री रावल यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती
- अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा बोगस प्रमाणपत्राचा पर्दाफाश, तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अधिकाऱ्याने दोघांचे प्रमाणपत्र केले रद्द!
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 19 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा
- अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमणे भुईसपाट होणार! ५० वर्षानंतर जलसंपदा विभागाची मोठी कारवाई
- राहता तालुक्यातील वाकडी-दिघी रोडवर पुन्हा बिबट्या जेरबंद, परिसरात भीती तर शेतकऱ्यांनी केली बंदोबस्ताची मागणी