Ahmednagar News : सध्या अनेक नको ती प्रकरणे कानावर येत आहेत. यामुळे मोठे वाद विवाद देखील होत आहेत. असाच प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव निपाणी वडगाव या गावात घडला आहे.
या भागात गावाच्या सिमेलगत राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाले. या झालेल्या वादातून एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून याच घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान या जखमी तरुणास उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. ही हाणामारी एका नाजूक कारणामुळे झाली असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात दोन कुटुंब जवळ जवळ राहतात. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान या दोन्ही कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली.
मात्र उतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एका गटाने कोयता कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुसऱ्या कुटुंबास मारहाण केली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु काही नाजूक कारणातून हा प्रकार झाले असल्याची चर्चा परिसरातील नागरिक खासगीत करत होते.