पारनेर पोलिस निरीक्षकांची शेतकऱ्याला धमकी

पारनेर – कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पारनेरच्या पोलिस निरीक्षकांविरुद्ध थेट मुख्यमंत्री सचिवालय व विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वनकुटे येथील १८ एकर जमिनीच्या वादावर न्यायालयाने रोहिदास देशमुख यास शेतात जाण्यास निरंतर मनाई केली होती. … Read more

लोकप्रतिनिधींनी निवेदन देणे हे आपले दुर्दैव : क्षितीज घुले

शेवगाव : मुळा धरणाच्या पाटपाण्यावर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क असून, जोपर्यत टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. तो पर्यत मुळा पाटपाणी आंदोलन तीव्र करणार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीलाच मुळा विभागात आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर त्यासारखे तालुक्याचे दुर्दैव नाही.असे मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी व्यक्त केले.. ढोरजळगाव येथे … Read more

मुकुंदनगरच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसराचा विकासात्मक दिशेने कायापालट होत आहे. रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले असून, या भागातील विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 मधील शाह शरीफ दर्गा रोड व मुल्ला कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत … Read more

गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने लष्करी व पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजौरी (जम्मू) येथे देश सेवेचे कर्तव्य बजावणारे सुभेदार विनोदकुमार चौहान आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून युवतींच्या संरक्षणासाठी धाऊन येणार्‍या सहा.पो.नि. कल्पना चव्हाण यांचा गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सुभेदार चौहान … Read more

पुरग्रस्त दत्तक घेतलेल्या गावाला जायंट्सची मदत रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी)- आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाणार्‍या जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने नगरमधून जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे, अन्न-धान्य, किराणा, दैनंदिन वापरातील वस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेली मदत कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली. श्रीमती कमलबाई कणकमल गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रकने भरलेले मदतीचे साहित्य कौठे (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथे नुकतेच रवाना झाली.कमलबाई कणकमल गुगळे … Read more

ग्रामपंचायत कर्मचार्‍याचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमधून 10 टक्के नोकर भरतीसाठी पात्र असतानाही डावलून अपात्र कर्मचार्‍यास नियुक्त केल्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी संजय डमाळे या ग्रामपंचायत कर्मचार्‍याने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले. तर ही भरती प्रक्रिया सदोष झाली असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या … Read more

कांद्याच्या बाजारभावात ३०० ते ५०० रुपये घट

राहुरी :- अवघ्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी घट झाली. रविवारी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये क्विंटल भाव मिळाला. शुक्रवारी १९०० ते २४०० रुपयांप्रमाणे विक्री झाली होती. रविवारी ३२ हजार ९९ गोण्यांची आवक झाली. दोन नंबर कांद्याला १००० ते १५९०, तीन नंबरला २०० ते ९९५, … Read more

‘संकटात लढणे’ ही संगमनेरकरांची परंपरा

अहमदनगर – ‘संकटात लढणे’ ही संगमनेरकरांची परंपरा आहे. मतभेद निर्माण करून काहीजण विष कालवण्याचा प्रयत्न काही करीत आहेत. आपल्याला सहकार, समाजकारण, राजकारण, संस्कृती टिकवायची असेल, तर आपआपसातील मतभेद विसरून एकत्रीतपणे आपली ताकद दाखवावी लागेल,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका दूध संघाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या … Read more

पाणीवाटपाच्या वादातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

पाथर्डी :- तालुक्यातील दगडवाडी येथे टँकरच्या पाण्यावरून वाद होऊन ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ दशरथ वाकचौरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. दगडवाडीत भिषण पाणी टंचाई आहे. मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी नियमित व वेळेवर येत नसल्याने अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ग्रामपंचायत कर्मचारी वाकचौरे प्रत्येक चौकात उभ्या केलेल्या प्लास्टिक टाक्या पाण्याने भरून देत असताना माझ्या हौदात पाणी … Read more

इंडिकाची धडक बसून पाच वर्षांच्या मुलाच मृत्यू 

अहमदनगर – जामखेड तालुक्यातील साकत येथील कोमल व गोविंद चव्हाण हे रक्षाबंधनासाठी सारणी (ता. केज) येथे गेले असताना त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा इंडिका कारची धडक बसून जागीच मृत्यू झाला. अथर्व गाेविंद चव्हाण असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोमल व तिचे पती अथर्वसह नांदूर फाट्यावरून टमटमने सारणी फाट्यावर उतरले. त्याचवेळी केजकडून येणाऱ्या इंडिकाची रस्त्याच्या कडेला असलेल्या अथर्वला … Read more

फुलसौंदर यांच्या मदतीला आ.संग्राम जगताप !

अहमदनगर  : माजी महापौर व शिवसेनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असून, याबाबत योग्य ती चौकशी करावी. फुलसौंदर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पोलिस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार जगताप यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर व इतर आठ जणांवर … Read more

भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहमदनगर  – शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणविरोधात  अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून काल शनिवारी (१७) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर, गणेश फुलसौदर, महेश … Read more

सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन

नगर : दिवंगत लोकनेते पद्मभुषण खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्या धर्मपत्नी व मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री प्रि श्रीमती सिंधुताई बाळासाहेब विखे पाटीलयांचे आज रविवार सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले त्या ८५ वर्षाच्या होत्या. आज प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.  आज दुपारी १२वा. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार … Read more

पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच अटलजींना श्रद्धांजली

अहमदनगर :- देशात भाजपची सत्ता आली आहे आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांना नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.  भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा … Read more

दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने प्रेमवेड्या तरुणाने केले हे कृत्य

अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत … Read more

जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व जनता स्वीकारेल, असे वाटत नाही !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे … Read more

विठ्ठलाच्या नगरीत सामूहिक बलात्कार

पंढरपूर : अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आल्याचे समजते. आरोपींपकी एकाने बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिल्याचे समोर आले आहे.  सूत्रांच्या माहितीनसार, पीडिता ही आरोपींपैकी एकाची मैत्रीण होती. आरोपीने … Read more

शिवसेना नेत्याच्या पुत्रावर जीवघेणा  हल्ला

अहमदनगर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मुलावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगा निशांत जखमी झाला आहे. अनिल माधव वैरागळ (टिळकनगर), शुभम दशिंग आणि दोन अनोळखी यांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निशांत हा बसस्टँडजवळ चहा पित होता. त्या वेळी अनिल वैरागळ याने शिवीगाळ करत हुज्जत घातली. … Read more