अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या चळवळीद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी कळमकर म्हणाले,आपण शहराचे महापौरपद भूषविलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला.शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर दिला.महापालिकेतील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करताना लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली.
याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच शहरात चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरुणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर आली की,लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही.अशा अनेक बाबींचा अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- झेडपी निवडणुकीत मोठा बदल! आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्याच ७३ गटांत रंगणार लढत
- अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी, जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार
- महाराष्ट्राला मिळणार एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ Railway मार्गासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद, कसा आहे रूट ?
- अहिल्यानगरमधील ‘या’ अभयारण्यात शिकार करायला परवानगी? अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लागला शिकारीला प्रोत्साहन देणारा फलक
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली