अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या चळवळीद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी कळमकर म्हणाले,आपण शहराचे महापौरपद भूषविलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला.शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर दिला.महापालिकेतील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करताना लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली.
याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच शहरात चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरुणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर आली की,लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही.अशा अनेक बाबींचा अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- इम्यूनिटीचा बुस्टर आहेत ‘या’ झाडांची पाने, केसांपासून हृदयापर्यंत मिळतात आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या खाण्याची पद्धत
- रिंकू सिंगसारखं यश तुम्हालाही मिळू शकतं, ‘या’ मूलांकला गुरु ग्रह देतो धन, प्रसिद्धी आणि मान! पाहा कोणत्या आहेत या भाग्यवान जन्मतारखा?
- भारतातील ‘या’ चमत्कारी मंदिरात देव स्वतः झाले होते प्रकट?, आजही मूर्ती दाबली की नाभीतून येते रक्त! कुठे आहे हे रहस्यमयी मंदिर?
- शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ ही उपाधी कुठे मिळाली?, जाणून घ्या या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास!
- ऐकावं ते नवलंच! चक्क आयुष्यभर अंघोळ करत नाही, तरीही ‘या’ देशातील महिला सौंदर्यात आघाडीवर, नेमकं काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट?