अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या चळवळीद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी कळमकर म्हणाले,आपण शहराचे महापौरपद भूषविलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला.शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर दिला.महापालिकेतील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करताना लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली.
याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच शहरात चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरुणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर आली की,लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही.अशा अनेक बाबींचा अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार Vivo V60; 3 कलर ऑप्शन, 6500 mAh बॅटरी अन बरच काही….
- आठव्या वेतन आयोगात 1800, 2000, 2800, 4200 आणि 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार? वाचा सविस्तर
- श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट
- AI टेक्नोलाॅजिमुळे अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्सला पसंती