अहमदनगर ब्रेकिंग : गावात येवू न दिल्याने महिला सरपंचांना मारहाण !

Published on -

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठीपोखरी बाळेश्वरमध्ये प्रवेशाचे सर्व रस्ते बंद असताना देखील चार जण गावात शिरण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांना गावात प्रवेश दिला नाही, याचा राग आल्याने या चौघांनी सरपंच मनिषा अर्जुन फटांगरे यांना शिवीगाळ करत व दगडाने मारून दुखापत केल्याची घटना बुधवार दि.१३ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोखरी बाळेश्वर गावातील ग्राम सुरक्षा समितीने गाव बंद केले असताना

किसन प्रल्हाद काळे यांच्या पाझर तलाव क्रमांक दोन या ठिकाणी अनाधिकृतपणे विहीरीचे बांधणीचे काम करण्यासाठी चार जणांनी गावात शिरण्याचा प्रयत्न केला.

त्याच दरम्यान त्याठिकाणी असलेल्या स्वयंसेवकांनी त्यांना गावात शिरू दिले नाही. त्याचा राग येवून किरण किसन काळे,अरविंद किसन काळे, किसन प्रल्हाद काळे, अमोल किसन काळे, यांनी सरपंच मनिषा फटांगरे व साक्षीदार यांना शिविगाळ केली.

त्यानंतर सरपंच महिला यांना दगड मारुन दुखापत केली. या प्रकरणी सरपंच मनिषा फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी वरील चौघांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe