पाथर्डी :- तालुक्यातील शिरापूर येथील पती-पत्नीने पैठण येथील जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने शिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सचिन विठ्ठल लवांडे (वय 29) व पत्नी कीर्ती सचिन लवांडे (वय 24) हे दोघे शनिवारी भाऊबीजेनिमित गावी गेले होते,

रविवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो झाला नाही.
सोमवार दि 4 रोजी सकाळी सकाळी पत्नीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगतांना आढळुन आला. दुपारनंतर पतीचा मृतदेह आढळुन आला.
यावेळी नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सोमवारी या दोघाचें मृतदेह जायकवाडी धरणाच्या पाण्यात तंरगतांना आढळुन आले. सहा महिण्यापुर्वी या दापत्यांचा विवाह झाला होता.
दरम्यान जोडप्याने घरातून होणाऱ्या अवहेलनेमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरच्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती.
त्यामुळे सुखात सुरू असलेला संसार या जोडप्याने संपवला.
या जोडप्याचं एकमेकांवर अतूट प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला. एकमेकांचा हात रुमालाने बांधून त्यांनी धरणात उडी घेतली.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या तरुण दाम्पत्याचं लग्न झाल्यानंतर किर्ता यांचा कुटुंबीयांकडून छळ करण्यात येत होता.
हा छळ पतीला सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
- मुंबई, दिल्ली, हैदराबाद…भारतीय चव जगभर पोहोचली, ‘या’ 6 शहरांनी आंतरराष्ट्रीय खाद्य यादीत मारली बाजी!
- श्रावण महिन्यात भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद हवाय?, मग धारण करा 5 मुखी रुद्राक्ष! जाणून घ्या रुद्राक्ष घालण्याचे नियम आणि पद्धत
- पाकिस्तान तर फक्त बाहुला, भारतासाठी खरा शत्रू ठरतोय शेजारी देश; ‘या’ प्रमुख पातळ्यांवर भारताला वाढला धोका!
- महाराष्ट्रातील ‘हे’ तीन महामार्ग नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाला जोडले जाणार !
- पोस्ट ऑफिसची ‘ही’ बचत योजना ठरणार गेमचेंजर ! 115 महिन्यांमध्ये पैसे डबल होणार, 10 लाखाचे 20 लाख करायचा सोपा फॉर्मुला