संगमनेर :-काँग्रेस पक्ष आज भाजप-सेने विरोधात आरपारची लढाई लढत असताना, पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या लढाईत सर्वस्व झोकून आज पक्षाचे काम करीत आहे.
मात्र, अशावेळी विरोधी पक्षनेते कोठे आहेत? आजच्या या संघर्षात त्यांचे योगदान काय? असा सवाल माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

आता विखे यांच्यावरील जनतेचा विश्वास संपला आहे. जनतेच्या मनात यांच्या तडजोडीबद्दल तिरस्कार आहे. प्रत्यक्ष प्रचाराला लागल्यावर विखे यांना याची जाणीव झाली आहे.
त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील विखेंना विरोध करायला सुरुवात केल्याचे सांगत आ. थोरात यांनी चिमटा काढला.
समन्यायी पाणीवाटप कायदा 2005 साली झाला, तेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मूग गिळून गप्प का बसले होते?
त्यांना जनतेचा खरोखरच कळवळा होता आणि कायद्याचे तोटे माहित होते तर त्यांनी त्यावेळी त्या कायद्याला विरोध का केला नाही,
असा सवाल करून हा कायदा आपण मांडलेला नाही, अशी स्पष्टोक्ती देत आ. बाळासाहेब थोरात यांनी ना. विखे पाटलांवर पलटवार केला.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!