अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.

पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.
या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.
कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी