अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.

पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.
या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.
कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्याचे सविस्तर दर?
- या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला बांधा ‘ही’ शुभ राखी, सोन्यासारखं उजळेल भावाचं नशीब!
- अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- अहिल्यानगर जिल्ह्यात माती तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा उभारल्या जाणार, दीड लाखांचे अर्थसाहाय्य मिळणार, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
- अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना १५ हजाराचा भाव, मोसंबीला मिळाला प्रतिक्विंटल ६ हजाराचा भाव