अहमदनगर :- नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
सोमवारी सायंकाळी वसंतटेकडी येथे जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू असतांना या संस्थेच्या टँकरवरील कर्मचारी कराळे हा टँकरवर चढला होता.
यावेळी तोल जावून घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.
- Best Gaming Laptop : 2025 मधील सर्वात पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप i9 प्रोसेसर आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप
- सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 25 फेब्रुवारीचे 10 ग्रॅम सोन्याचे दर कसे आहेत ? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगावसह तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
- Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 248 किमीच्या जबरदस्त रेंजसह लाँच – किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
- 2025 Kia Seltos आता आणखी स्वस्त ! दमदार इंजिन, जबरदस्त मायलेज आणि अधिक फीचर्स
- 34km मायलेज देणारी मारुती कार फक्त दोन लाखांत मिळणार जाणून घ्या ऑफर