अहमदनगर :- नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
सोमवारी सायंकाळी वसंतटेकडी येथे जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू असतांना या संस्थेच्या टँकरवरील कर्मचारी कराळे हा टँकरवर चढला होता.
यावेळी तोल जावून घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.
- सावधान ! कुलरचा स्फोट होण्याचे प्रकार वाढले; नेमके कारण काय? उपाय काय? वाचा एका क्लिकमध्ये
- सोन्याच्या किमतीत पुन्हा 1,250 रुपयांची घसरण ! 11 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा…
- माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते? ‘या’ नव्या संशोधनाने आता सगळेच चक्रावले
- आंबा घेताय पण तो गोड आहे की आंबट..? अगदी सोप्पा ट्रिक्सने तुम्हाला आंब्यातील गोडवा कळेल
- भेंडी खाताय..? तर आत्ताच व्हा सावधान; भेंडीसोबतचे ‘हे’ 5 काँम्बिनेशन आहेत घातक