संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले.
संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठताच कारवाई सत्र आरंभिले आहे.

शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करताना अनधिकृतपणे पाणी वापरासाठी धरणात टाकलेले बारा वीज पंप जप्त केले.
कोटमारा धरणाची क्षमता १५५ दशलक्ष घनफूट असून आज या धरणात केवळ ५ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांच्या पाणी योजनांचा पाणी पुरवठा या धरणावर अवलंबून आहे.
आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा यादृष्टीने नियोजन सुरु आहे.
उपलब्ध व मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांसाठी उर्वरित पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १०-१५ दिवस पुरेल. पाणी चोरी सुरु राहिली तर सात दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे.
उन्हाळात होणाऱ्या पाणीचोरीशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होत आहे. धरणात सध्या २ ते ३ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने गांभीर्याने कारवाई करणे आवश्यक आहे.
- घोडेगावात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट बसवण्यासाठी ५३१ रूपये दर असतांना उकळले जात आहेत ७०० रूपये, वाहनमालकांचा आरोप
- अहिल्यानगर- अजमेर रेल्वे सुरू करण्याची शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांची मागणी, खासदार निलेश लंके यांना निवेदन
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ह्या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचंही नाव आहे का ? पहा….
- चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी