संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले.
संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठताच कारवाई सत्र आरंभिले आहे.

शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करताना अनधिकृतपणे पाणी वापरासाठी धरणात टाकलेले बारा वीज पंप जप्त केले.
कोटमारा धरणाची क्षमता १५५ दशलक्ष घनफूट असून आज या धरणात केवळ ५ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांच्या पाणी योजनांचा पाणी पुरवठा या धरणावर अवलंबून आहे.
आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा यादृष्टीने नियोजन सुरु आहे.
उपलब्ध व मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांसाठी उर्वरित पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १०-१५ दिवस पुरेल. पाणी चोरी सुरु राहिली तर सात दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे.
उन्हाळात होणाऱ्या पाणीचोरीशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होत आहे. धरणात सध्या २ ते ३ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने गांभीर्याने कारवाई करणे आवश्यक आहे.
- Sarkari Yojana: मुलीचा जन्म झाला की फक्त एक अर्ज… सरकार देईल 1 लाख 1 हजार.! एका क्लिकवर या योजनेची संपूर्ण माहिती
- मोठी बातमी ! आता रेशन कार्ड धारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागणार, नाहीतर Ration Card रद्द होणार
- राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाकडून महत्वाचा जीआर निघाला
- Government Scheme: बेरोजगारांसाठी खुशखबर! स्वतःचा उद्योग सुरू करा आणि मिळवा 50 लाखांचे कर्ज व 35% अनुदान… सरकारची सुवर्णसंधी
- Jamin Mojani: शेतकऱ्यांनो, जमीन मोजणीसाठी पुन्हा पुन्हा चकरा नाहीत! सरकारने केली जबरदस्त व्यवस्था… जाणून घ्या काय केले बदल?