अहमदनगर :- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात चोमेवाडी परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी रोहिणी नवनाथ निंबाळकर (चोमे) हिने माहेरचे नातेवाईक मामा यांच्याकडून शेतीचे कामाकरिता व दुकानासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन तुला घरातील काम नीट येत नाही. तू येथे राहू नको, तसेच नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर याला दुसरी बायको करुन दे, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
या छळास कंटाळून रोहिणी निंबाळकर या विवाहित तरुणीने शेतातील शेततळ्यातील पाण्यात उडी घेतली व त्यात ती बुडून मयत झाली. याप्रकरणी मयत रोहिणीचे मामा दत्तात्रय लक्ष्मण हरगुडे, रा. केसनंद हवेली पुणे,
यांच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसांत आरोपी नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर, सासरा, सुभाष दगडू निंबाळकर, दीर संतोष सुभाष निंबाळकर (चोमे), जाव उषा संतोष निंबाळकर (चोमे) सर्व रा. बेलवंडी, चोमेवाडी, श्रीगोंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग