अहमदनगर: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काल (गुरुवार) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही.

पण असं असलं तरी सुजय विखे-पाटलांचा भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम ठोकत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी अहमदनगरची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. यासाठी १ एप्रिलला सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
पण काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता.
त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता निवडणूक आयोगाने सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरवल्याने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
- iPhone 18 Pro आणि Pro Max बद्दल मोठी अपडेट! सप्टेंबर 2026 मध्ये लाँच, पहिला फोल्डेबल आयफोनही येणार?
- सूर्यप्रकाशावर चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार! Nissan Ariya Solar Concept ने उघडली भविष्यातील ईव्हीची नवी वाट
- मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! हाय-स्पीड रेल्वेने महाराष्ट्राच्या दळणवळणात ऐतिहासिक बदल
- खाजगी वाहनांसाठी FASTag वरून ‘KYV’ अट रद्द; 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन नियम लागू
- १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींना मंजुरी; ८ व्या वेतन आयोगाबाबत प्रतीक्षा कायम













