अहमदनगर: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काल (गुरुवार) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही.

पण असं असलं तरी सुजय विखे-पाटलांचा भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम ठोकत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी अहमदनगरची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. यासाठी १ एप्रिलला सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
पण काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता.
त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता निवडणूक आयोगाने सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरवल्याने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
- बँक ऑफ बडोदाची एफडी योजना ठरणार फायदेशीर, 12 महिने दोन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा…
- 10 लाखांत मिळणाऱ्या टॉप 5 ADAS कार! होंडा, मारुती, महिंद्रा कोणता ब्रँड बेस्ट ?
- Best Cars Under 10 lakhs : ह्या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स ! किंमत फक्त दहा लाख
- Airtel ग्राहकांसाठी मोठी ऑफर ! 365 दिवस अमर्यादित कॉलिंग आणि 30GB डेटा…
- 99Wh बॅटरी, AI असिस्टंट आणि तगडा प्रोसेसर! Xiaomi च्या पहिल्या AI PC बद्दल जाणून घ्या