अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे.
यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाण्यामुळे पिके सडू लागली आहेत. मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळा होता.

तर यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. सततच्या पावसाने परिसरातील बाजरी, कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- पोस्ट ऑफिस ची ही बचत योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल! एक लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार 45 हजाराचे व्याज
- मोठी बातमी ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ वर्ष शिक्षक भरती होणार नाही, काय आहे यामागील कारण?
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2, 5, 6 आणि 7 डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद राहणार, कारण काय?
- सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती कमी झालेत दर ? वाचा……
- भारतातील सर्वात उंच स्थानक 2027 मध्ये सेवेत ! ‘या’ शहरात विकसित करणार 16 मजली उंच रेल्वे स्टेशन ! लंडन, पॅरिसला देणार टक्कर













