अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे.
यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाण्यामुळे पिके सडू लागली आहेत. मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळा होता.

तर यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. सततच्या पावसाने परिसरातील बाजरी, कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- स्टेट बँकेत २२७३ पदांसाठी मोठी भरती; सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
- CNG कार खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त CNG कार-टाटा टियागोची किंमत, मायलेज आणि फीचर्स
- अर्थसंकल्पाआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची संधी
- एलआयसी पॉलिसी मॅच्योरिटीपूर्वी बंद करायची? सरेंडर करण्याआधी हे नुकसान नक्की समजून घ्या
- समृद्धी महामार्गावर ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान महत्त्वाची कामे; ‘या’ कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद













