अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.
शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये नगर, श्रीगोंदे, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
शेतकऱ्यांचे खरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमला माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.
- Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला
- SBI लाईफची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! गुंतवणूकदारांना ‘इतका’ Dividend मिळणार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे रेकॉर्ड डेट
- 15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची
- अतिक्रमणासंदर्भात संसदेत आवाज उठविणार ! न्यायालयीन लढाई देखील लढणार – खा. नीलेश लंके आक्रमक
- ‘इतका’ पगार असेल तर SBI कडून 50 लाखाचे Home Loan मिळणार ! तुम्हाला मिळणार का एवढं कर्ज ? EMI किती भरावा लागेल ? पहा….