अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे.
सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत.

त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अनेकांना नकोसे झाले आहे.एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तर मे मध्ये उन्हाच्या तीव्रता किती असेल, याची भीती नगरकरांनी घेतली आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानातही सायंकाळी लहानग्यासंह ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे चित्र सर्व उद्यानांत दिसून येत आहे.
रविवारी शहरात तापमानाने उच्चांक गाठला. रविवारी नगरचे तापमान ४५. अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी तापमान ४४.९ अंश नोंदवले गेले. नगरमध्ये यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
- टाटा स्टील शेअर्समध्ये अचानक उसळी ! गुंतवणूकदारांसाठी सोन्याची संधी का आहे?
- भारतात किती महिला मोबाईल वापरतात ? समोर आली धक्कादायक माहिती
- Explained : नगरच्या राजकारणात बदलतंय समीकरण ? थोरात ते कर्डिले… हिंदूत्वाच्या राजकारणात कोण पुढे, कोण मागे?
- Vastu Tips: रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही कुणाला देऊ नका; नशीब आणि संपत्ती दोन्ही गमवाल!
- तुमच्या पार्टनरच्या नावाची सुरुवात ‘D’ ने होते का?, मग हे गुण आणि दोष आधीच जाणून घ्या!