अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे.
सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत.

त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अनेकांना नकोसे झाले आहे.एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तर मे मध्ये उन्हाच्या तीव्रता किती असेल, याची भीती नगरकरांनी घेतली आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानातही सायंकाळी लहानग्यासंह ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे चित्र सर्व उद्यानांत दिसून येत आहे.
रविवारी शहरात तापमानाने उच्चांक गाठला. रविवारी नगरचे तापमान ४५. अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी तापमान ४४.९ अंश नोंदवले गेले. नगरमध्ये यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी इतक्या वेळा वाढणार महागाई भत्ता, वाचा….
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कंपनीने दिली पुन्हा एकदा कमाईची मोठी संधी, वाचा सविस्तर
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळाला 280 KM लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! कसा आहे प्रकल्प?
- पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! आता दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
- हवामानात अचानक झाला मोठा बदल….! ऐन हिवाळ्यात राज्यात गारपीटीची शक्यता, हवामान तज्ञाच्या अंदाजाने खळबळ













