अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे.
सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत.

त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अनेकांना नकोसे झाले आहे.एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तर मे मध्ये उन्हाच्या तीव्रता किती असेल, याची भीती नगरकरांनी घेतली आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानातही सायंकाळी लहानग्यासंह ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे चित्र सर्व उद्यानांत दिसून येत आहे.
रविवारी शहरात तापमानाने उच्चांक गाठला. रविवारी नगरचे तापमान ४५. अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी तापमान ४४.९ अंश नोंदवले गेले. नगरमध्ये यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













