अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.
त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना