अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.
त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत चार लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…
- ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल; एका महिन्यात 135% रिटर्न!
- कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्ष काम केलं असेल आणि शेवटचा पगार 35,000 असेल तर किती ग्रॅच्युइटी मिळेल ?
- Tata समूहाचा ‘हा’ स्टॉक 4 हजार रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत 95 लाख शेअर्स
- मारुती एस-प्रेसो आता आणखी महाग ! किंमतीत झाली इतकी वाढ