अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.
त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार, तर लाडक्या बहिणींना मिळणार आणखी पंधराशे रुपये ! 5 फेब्रुवारीआधी सरकार मोठा निर्णय घेणार ? कारण….
- आनंदाची बातमी ! हायवेवर प्रवास करताना गाडी खराब झाली किंवा पेट्रोल संपले तर आता जागेवर मिळणार मदत ! ‘या’ नंबरवर करा संपर्क
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार, सरकारचा सकारात्मक प्रस्ताव समोर !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या 3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट ! केव्हा निघणार जीआर? मंत्रालयात काय सुरूय?
- संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 4 हजार 500 रुपयांचा भाव !













