… असे घडल्यास जिल्ह्याची फार मोठी हानी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील पन्नास टक्के भाग हा मुळा धरणावर अवलंबून आहे. यामध्ये नगर व सुपा येथील एमआयडीसीला देखील मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो.

के.के.रेंज क्षेपणास्त्रामुळे मुळा धरणाच्या भिंतीला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास जिल्ह्याची फार मोठी हानी होईल.

अशी भीती व्यक्त करीत माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या काळामध्ये तयार झालेला काळू मध्यम प्रकल्पही के. के. रेंज परिसरातच येत असल्याने या प्रकल्पाला देखील धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

त्यामुळे के.के. रेंजच्या विस्ताराबाबत लष्कराने पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News