सर्वात मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी 27 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  कर्जत तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई होत नाही. 

त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी कर्जतकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्या 17 पासून ते 27 ऑगस्टपर्यंत कर्जतमध्ये जनता कर्फ्यू राहणार आहे. शहरातील व्यावसायिक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतला असल्याची माहिती दीपक शहाणे यांनी दिली.

हा निर्णय घेताना अर्जुन भोज, सचिन घुले, सोमनाथ कुलथे, महावीर बोरा, विक्रम गदादे आदी उपस्थित होते. या जनता कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे व्यावसायिक संघटनांनी सांगितले. हा निर्णय घेत असताना सत्तेत असलेले राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते असहमत आहे. त्यांचा या जनता कर्फ्यूला एकप्रकारे विरोध दिसत नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe