कर्जत – भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, कर्जत तालुक्यातील सिद्धटेक पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रविवारी (दि. 4) रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद केली आहे. खेड-भिगवणमार्गे वाहतूक करण्याचे प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे.
चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, नगर व पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिद्धटेक पुलावरून पाणी वाहू लागल्याने येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रविवारी रात्रीपासून दौंड येथून एक लाख 91 हजार 788 क्यूसेक वेगाने पाणी वाहत असून, भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड येथे 504 मीटर ही धोक्याची पातळी आहे. सध्या 505.950 मीटरने धोक्याची पातळी ओलांडून नदी प्रवाह वाहत आहे.
रविवारपासून पुराच्या पाण्यात प्रचंड वाढ झाल्याने उजनी धरण पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. सध्या उजनी धरण साठ्यात 67.60 टक्के वाढ झाली आहे. सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील वाहन तळ, शौचालय हे पाण्याखाली गेले आहेत. परिसरातील नदीकाठच्या शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
- अहिल्यानगर : चौंडीतील ऐतिहासिक बैठक रद्द ! मुंबईकडे वळले सरकार
- iPhone 16e लाँच किंमतीपेक्षा स्वस्त! Amazon वर सुरू आहे धमाकेदार डील
- HP चा मोठा धमाका,नेक्स्ट जनरेशन AI लॅपटॉप्स भारतात केले लॉन्च, किंमती ऐकून थक्क व्हाल
- 7300mAh बॅटरी आणि AI फीचर्ससह iQOO चे स्मार्टफोन्स झाले लॉन्च ! AI नोट्स, फास्ट चार्जिंग, गेमिंग पॉवरहाऊस…
- ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार, किती वाढला DA? वाचा…