अहमदनगर :- कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु असताना, चांदा (ता. नेवासा) येथील मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईदनिमित्त जमा केलेली मदत मंगळवारी पाठवली.
चांदा येथील मुस्लिम समाज बांधवांनी ईद साध्या पध्दतीने साजरी करीत सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. ईदच्या नमाजनंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावातून मदतफेरी काढण्यात आली होती.

यावेळी मुस्लिम बांधवांसह नागरिकांना सढळ हाताने मदत केली. अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तूंची जमा करण्यात आलेली मदत ट्रकद्वारे पाठविण्यात आली आहे.
मदत संकलन करण्यासाठी शकील कुरेशी, बशीर मेंबर कुरेशी, सादिक कुरेशी, शब्बीर तांबोली, रफिकभाई मिस्तरी, समीर तांबोली, हामिद मुलानी, अस्लम कुरेशी, भैय्या शेख, डॉ.सुहेल शेख आदी गावातील मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले.
- डोंबिवली ते हिमाचल प्रदेश…भारतातील ‘ही’ 6 रेल्वे स्थानके खरंच भुताने पछाडलेली?, प्रवासी आजही पाय ठेवायलाही थरथरतात!
- भारतात कोणत्या राज्यात धावतात सर्वाधिक ट्रेन, कमाईच्या बाबतीत कोण देतं सर्वाधिक उत्पन्न? वाचा स्पेशल रिपोर्ट!
- एखादं गाव वसवता येईल इतकं मोठं…’हे’ आहे भारताचं सर्वात मोठं विमानतळ! पाहा खास वैशिष्ट्यं
- मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!
- संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय