नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, सावळेराम दामू जाधव, अंबादास दामू जाधव, शिवाजी दामू जाधव, नंदू सोमा जाधव, हिराबाई दामू जाधव, सविता सावळेराम जाधव, राणी शिवाजी जाधव, मीराबाई अशोक धोत्रे (सर्व रा. नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन अहवाल केला सादर
- सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! पुण्यासाठी सुरु झालीये Vande Bharat Train, कसं आहे वेळापत्रक?
- अहिल्यानगरमध्ये १०० हून जास्त कत्तलखाने! घरातून होम डिलिव्हरीद्वारे गोमांस विक्री, दुसऱ्या मजल्यावरही सुरू आहेत कत्तलखाने
- 12 वर्षानंतर गुरु ग्रहाचे कर्क राशीत आगमन! ‘या’ राशीच्या लोकांना येणार सुखाचे दिवस, मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण
- राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या राजकीय वादात करोडोच्या उद्यान प्रकल्पाची झाली दुर्दशा; झाडे जळाली, कोनशिलाही गायब