मथुरा : दहशतवाद एक वैश्विक समस्या बनली असून तिने जणूकाही विचारसरणीचे रूप धारण केले आहे. अशातच आमचा शेजारी देश (पाकिस्तान) दहशतवादाला पोसत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली आहे.
भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करीत असून, भविष्यातही करणार असल्याचे त्यांनी ठणकाविले आहे.

उत्तरप्रदेशातील पशुधन रोग निर्मूलन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, अतिरेक्यांना आश्रय देणे व प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण भारत प्रयत्नशील आहे.
अनेकदा आम्ही दहशतवादी कारवाया हाणून पाडल्या आहेत; परंतु आजघडीला दहशतवाद एक विचारधारा बनली आहे. तिने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. एवढेच नव्हे, तर दहशतवाद एक वैश्विक समस्या बनून आ वासून उभी ठाकली आहे.
त्यातच आमचा शेजारी देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्यांच्या देशात अतिरेकी मोकाट आहेत. त्यामुळे संपूर्ण विश्वाने एकजूट दाखवीत अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.
अतिरेकी संघटनांची नावे बदलली तरी त्यांच्या वाईट कृत्यावर पडदा पडणार नाही. समस्या प्रदूषणाची असो वा आजारपणाची, त्यावर मात करणे शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग