नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील.
मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात दिले.

‘गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मी पक्ष बदलणार असल्याबाबतचे मेसेज मुद्दाम व्हायरल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला आहे. मात्र, मी पूर्वीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसशी बांधील असून, एकनिष्ठ आहे.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या लाटेतही जनतेने मला विश्वासाने निवडून दिले. त्यामुळेच नगर शहराला विकासाची गती देऊ शकलो,’ असा दावाही त्यांनी केला.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













