श्रीरामपूर :- भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या असे आवाहन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रचारादरम्यान केले.
मतदार संघातील चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करंजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खु., पढेगाव, निपाणीवडगाव येथील प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते, सण १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला, हक्काचे पाणी गेले, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

आज अशोक उद्योग समूह एवढे एकच विकासाचे व अर्थकारणाचे केंद्र उरले आहे. पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडले या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या च्या उमेदवारास विजयी करा असे ते यावेळी म्हटले.
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा
- मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांवर कडक निर्बंध लागू













