श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.
समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.

त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये श्री. मुरकुटे बोलत होते.
मुरकुटे म्हणाले, सन १९९९ मध्ये केलेली चूक आता भोगावी लागत आहे. सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. तालुक्याच्या हक्काचे पाणी गेले.
शेती उजाड; तर शेतकरी उद्ध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर व गोरगरीबांचा रोजगार गेला.
पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडल्याची भिती आहे. या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास साथ द्या.
- मेकअप करण्यापूर्वी चुकूनही गुलाब जल लावू नका, चुकीच्या पद्धती त्वचेला पोहोचवतात हानी! जाणून घ्या योग्य वापर
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 7 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार
- नारळ, तीळ की सूर्यफूल…ऑइल पुलिंगसाठी सर्वोत्तम तेल कोणते?, जाणून घ्या योग्य आयुर्वेदिक पद्धत!
- कोपरगाव तालुक्यातील गावठी हातभट्टयांवर पोलिसांचा छापा, १ लाखांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन केले नष्ट
- फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! एक ऑगस्ट 2025 पासून लागू होणार नवीन नियम