श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक उमेदवार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांचे पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे करण ससाणे यांच्या गटाची धरावे की सोडावे अशी अवस्था झाल्याने ससाणे गटाची यंत्रणा कुणाला मदत करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात ससाणे गट व भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधातील लोकांनी राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क साधून अपक्ष उमेदवार उभा करण्याची योजना आखली होती. तशी तयारीही पूर्ण झाली होती.
याबाबत आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनाप्रमुखांचे लक्ष वेधून नामदार विखे यांना पक्षाचे काम करण्याबाबत समज द्यावी असे सांगितल्याची चर्चा असून त्यानुसार उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे यांच्याशी चर्चा करून युती धर्म पाळण्याची सूचना केली होती. त्यानंतर लगेच विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संपर्क करुन भाऊसाहेब कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिला.
- किया सेल्टोससोबत ‘K.I.D.’ उपक्रमाचे पुनर्लाँच; सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगसाठी नवे डिजिटल पाऊल
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा












