पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.

अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि कुटुंबासह शनी चरणी
- ह्या कारणामुळे झालं माझं वाटोळे ! सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्यात संगळंच सांगितलं…
- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, उत्तर महाराष्ट्रातील अनेक स्थानकावर घेणार थांबा
- नवी मुंबईतील ‘या’ भागात फक्त 25 लाखात घर मिळणार, सिडकोकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार, कधी निघणार जाहिरात? वाचा….
- अहिल्यानगरच्या डॉ. सौरभ हराळ यांना आंतरराष्ट्रीय यंग रिसर्चर पुरस्कार डोळ्यांच्या ॲलर्जीवरील नवीन उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी सन्मान