पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.

अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- .…तर वाहनांना टोल नाक्याच्या पुढे जाताच येणार नाही ! टोल वसुलीबाबत केंद्राचा नवा निर्णय कसा असणार ?
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांना टीईटी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट, वाचा सविस्तर
- ब्रेकिंग ! सोमवारी पुणे शहरातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; शाळा-कॉलेजसला पण सुट्टी
- पुणे ते सातारा प्रवास होणार वेगवान ! ‘या’ घाटातील 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात, वाचा सविस्तर
- महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज ! ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार रक्कम













