अहमदनगर – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.
पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
- शनी, मंगळ, शुक्र ग्रहाच्या बदलत्या चालेमुळे घडणार चमत्कार; श्रावण महिन्यात 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
- भारताच्या शुभांशू शुक्लाने अंतराळातून टिपला पृथ्वीचा अद्भुत नजारा, पाहा फोटो!
- पावसाळ्यात चेहरा चिकट पडतोय, पिंपल्सनेही त्रास दिलाय? जाणून घ्या बेस्ट स्किनकेअर टिप्स!
- मित्रांच्या बहीणींवरच जडलं प्रेम…, ‘या’ 5 क्रिकेटपटूंनी टीममेटच्या बहीणींशीच थाटला संसार! वाचा त्यांच्या भन्नाट लव्ह स्टोरीज
- शेतकऱ्यांनो PM किसानचे ₹2000 रुपये पाहिजे असतील, तर आत्ताच ‘ही’ कामे करून घ्या! अन्यथा खात्यात 20 वा हप्ता जमा होणार नाही