हाजीपूर : बिहारच्या नागरिकांविषयी अवमानास्पद विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात येथील एका न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘बिहारचे नागरिक ५०० रुपयांचे तिकीट काढून रेल्वेने दिल्लीला येतात व ५ लाख रुपयांचा मोफत उपचार करवून परत बिहारला निघून जातात,’ असे वादग्रस्त विधान अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले होते.

त्यांच्या या विधानाप्रकरणी नितीश कुमार नामक एका सामाजिक कार्यकत्र्याने शुक्रवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रेमचंद्र वर्मा यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार आता पुढील सुनावणीसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे वर्ग करण्यात आली आहे.
‘केजरीवाल यांच्या विधानामुळे आपले मन दुखावले गेले,’ असे कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याचे त्यांचे वकील सुरेंद्रकुमार भारती यांनी सांगितले आहे. ‘दिल्लीच्या मुख्यमंर्त्यांचे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.
त्यांनी आपल्या वक्तव्यातून देश व राज्यातील शांतता, एकोपा, अखंडत्व व सुसंवाद बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल,’ असे कुमार यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
- नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, गडाख गटासमोर आमदार लंघेची प्रतिष्ठा पणाला
- शनि शिंगणापूर सौरऊर्जेने उजळणार, दिल्लीतील शनि भक्ताने दिले ८० लाख रूपयांचे भव्य दान
- संगमनेरमध्ये सव्वादोन कोटींच्या विकासकामांच्या निधीवरून राजकारण तापले, काँग्रेसचा आमदार खताळांवर जोरदार पलटवार
- पोस्ट ऑफिसच्या 3 वर्षाच्या एफडी स्कीममध्ये 1 लाख रुपयांची एफडी केली तर किती पैसे मिळतील ? गुंतवणूकदार बनणार मालामाल
- कोपरगामध्ये कोल्हे गटाला मोठा झटका! सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी केला काळे गटात प्रवेश