हाजीपूर : बिहारच्या नागरिकांविषयी अवमानास्पद विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात येथील एका न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘बिहारचे नागरिक ५०० रुपयांचे तिकीट काढून रेल्वेने दिल्लीला येतात व ५ लाख रुपयांचा मोफत उपचार करवून परत बिहारला निघून जातात,’ असे वादग्रस्त विधान अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले होते.

त्यांच्या या विधानाप्रकरणी नितीश कुमार नामक एका सामाजिक कार्यकत्र्याने शुक्रवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रेमचंद्र वर्मा यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार आता पुढील सुनावणीसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे वर्ग करण्यात आली आहे.
‘केजरीवाल यांच्या विधानामुळे आपले मन दुखावले गेले,’ असे कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याचे त्यांचे वकील सुरेंद्रकुमार भारती यांनी सांगितले आहे. ‘दिल्लीच्या मुख्यमंर्त्यांचे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.
त्यांनी आपल्या वक्तव्यातून देश व राज्यातील शांतता, एकोपा, अखंडत्व व सुसंवाद बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल,’ असे कुमार यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !
- IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइल अंतर्गत 97 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- SBI कडून 30 लाखांचे Home Loan मिळवायचंय मग तुमची महिन्याची कमाई किती हवी ? वाचा….
- सरकारी कर्मचाऱ्यांनो फक्त 10 दिवस थांबा ! दहा दिवसांनी महागाई भत्ता वाढणार, यावेळी किती वाढणार DA ? वाचा….
- बजेट फोन घ्यायचा आहे ? 6000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स असलेला Itel Power 70 पाहा