अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- महत्वाची बातमी ! आता व्हाट्सअपवर मिळणार Aadhar Card, सरकारने सुरू केली नवीन सुविधा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन मिटले ! e-KYC करतांना ‘ही’ काळजी घ्या Error येणार नाही
- अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मुंबईला जाण्यासाठी 135 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग तयार होणार, कसा असणार रूट ?
- कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ईपीएफओचे नियम पुन्हा बदलणार, आता पीएफची रक्कम……
- सावधान ! 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ‘या’ 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता