अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- मुंबई-गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! महामार्गावरील कशेडी बोगद्याचे ‘या’ तारखेला उदघाट्न , आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात
- लाडक्या बहिणींनो 01 मे 2025 रोजी खात्यात जमा होणार एप्रिलचा हप्ता ! ‘या’ 7 लाख महिलांना 1500 नाही तर फक्त 500 रुपये मिळणार
- कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरुणींची फिल्मी स्टाईल हाणामारी, कॉलेजच्या विद्यार्थिनींचा जोरदार राडा सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा व्हिडीओ
- मोठी बातमी ! केंद्रातील मोदी सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय ! शेवटची जातीय जनगणना कधी झाली ? वाचा….
- विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?