अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! जारी झाले महत्त्वाचे शासन परिपत्रक
- रिझर्व बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला मोठा दणका….! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ?
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ काम केले नाही तर खात्यातून पैसे काढता येणार नाहीत
- Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! या 5 म्युच्युअल फंडांनी दिलेत 31% रिटर्न; 3 वर्षातचं पैसा झाला तीनपट
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! कमी दिवसात जास्त कमाई, ‘हे’ 3 स्टॉक ठरतील फायदेशीर













