नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या वर्षी 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झाले. यावेळी मोदीं यांनी बनविलेल्या नव्या मंत्र्यांच्या टीममध्ये जेडीयू पक्षाचा एकही मंत्री नव्हता.
यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील एक प्रकारे प्रतिकात्मक प्रतिनिधीत्व मिळाले होते. मित्रपक्षांच्या कोट्यामधून आणखी काही मंत्र्यांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकालात मंत्र्यांनी आतापर्यंत किती काम केले. या सर्व कामांची समीक्षा करणार आहेत. या आधारावर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट ! खा. नीलेश लंके यांचा आरोप विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा
- अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात
- Ordnance Factory Bhandara Jobs: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 125 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती….
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ आणखी 2 मागण्या मान्य होणार !
- जयहिंद शिबिरात बालकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार ; विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा निर्धार