नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या वर्षी 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झाले. यावेळी मोदीं यांनी बनविलेल्या नव्या मंत्र्यांच्या टीममध्ये जेडीयू पक्षाचा एकही मंत्री नव्हता.
यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील एक प्रकारे प्रतिकात्मक प्रतिनिधीत्व मिळाले होते. मित्रपक्षांच्या कोट्यामधून आणखी काही मंत्र्यांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकालात मंत्र्यांनी आतापर्यंत किती काम केले. या सर्व कामांची समीक्षा करणार आहेत. या आधारावर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- पैशाच्या तंगीने त्रस्त आहात?, ‘या’ प्रभावी वास्तु उपायांनी होईल लक्ष्मीचं आगमन!
- 9 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा सॅमसंग आणि मोटोरोला फोन! जाणून घ्या ही भन्नाट डील
- रेल्वे स्टेशनवर थांबत नाही, प्रवासी चढत-उतरत नाहीत; तरीही रोज विकली जातात तिकिटे! उत्तर प्रदेशमधील ‘या’ स्टेशनची कहाणी तुम्हाला थक्क करेल
- इंग्लंडच्या लॉर्ड्स, ओव्हल आणि एजबॅस्टनवर ‘या’ भारतीय खेळाडूंनी रचलेत मोठे विक्रम! पाहा यादी
- 18 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार ! नशिबाच्या साथीने मिळणार जबरदस्त यश