हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय.
कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !
- 7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती













