हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय.
कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
- पूर्व जन्माचे कर्मफळ घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! जन्मतारखांनुसार ओळखा कसे असेल तुमचे भविष्य?
- 508 किमी प्रवास अवघ्या 3 तासांत! देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?, रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्व अपडेट
- महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला 27 जुलैपासून एक अतिरिक्त थांबा मंजूर ! वेळापत्रकात झाला मोठा बदल
- फक्त मांसाहारी नाही, शाकाहारी अन्नातूनही मिळते 20 ग्रॅमपर्यंत प्रोटीन! पाहा ‘प्रोटीन बूस्ट’ देणारे 5 सुपरफूड्स
- अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती