नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राजेंद्र चोपडा, विशाल शेटीया, डॉ. सचिन भंडारी, कमलेश भंडारी, भूषण भंडारी, नितिन शिंगवी, राजेश भंडारी, मुकुंद धूत, विनोद मालपाणी, भरत जाकोटिया, दिपक बोयटा, अनिल लुंकड, ईश्वर बोरा, सुनिल भंडारी, धनेश कोठारी,
राहुल भंडारी, अमित मुथा, प्रशांत मुथा, अविनाश घुले, प्रविण कोठारी, अभय गुजराथी, भाऊसाहेब पांडुळे, सचिन डुंगरवाल, सुरेश धामत आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, नगर विकासकामाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. मध्यवर्ती शहर असल्यामुळे शहराचा विकास होणे गरजेचे होते, परंतु त्यासाठी यापूर्वीच्या नेतृत्वाने कधीही प्रयत्न केले नाहीत.
मागील पाच वर्षापासून मी विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. नगर शहरात अनुचित प्रकार घडवायचा व नंतर व्यापारी बाजारपेठ बंद करायच्या या प्रकारामुळे ग्रामीण भागातील ग्राहक नगर शहरात खरेदीसाठी येत नव्हता.
व्यापाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम त्यांनी केले. मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. आता आपल्याला सर्वांना मिळून नगर शहराचे रुपांतर महानगरामध्ये करायचे आहे. पुणे-नाशिक शहराबरोबर नगरची ओळख निर्माण करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
- SBI कडून 30 लाखांचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा सविस्तर
- 365 दिवसांच्या एफडीवर ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज !
- विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
- SBI CBO Jobs 2025: पदवीधरांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! CBO पदाच्या तब्बल 2964 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- …….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?