अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

संगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे, असाही दावा सुजय विखेंनी केला. महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत संगमनेरमधून आपल्याला 13 हजार मतांची आघाडी मिळाल्याचंही विखेंनी नमूद केलं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, असे आश्वासनही दिले.
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
- अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा
- ‘दोन दिवसात जीवे ठार मारू…’ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना धमकी !
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ 18 हजार शाळा बंद केल्या जाणार ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती