तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- किया सेल्टोससोबत ‘K.I.D.’ उपक्रमाचे पुनर्लाँच; सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगसाठी नवे डिजिटल पाऊल
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा












