तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- सोमवारपर्यंत 1 शेअर्स घ्या आणि मिळवा 4 बोनस शेअर्स! बघा ‘या’ कंपनीचा धमाका
- अहिल्यानगर जिल्ह्यात १४ महिन्यांत ३४९० बाळांचा झाला जन्म, अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या दोन नवजात बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया
- मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
- सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! हजार-लाखोंत नाही तर कोटींमध्ये संपत्ती कमवतात, प्रेमात मात्र…
- भारताची संरक्षण क्षमता गगनाला भिडणार! ‘या’ नवीन स्वदेशी लढाऊ विमानामुळे चीनलाही फुटला घाम, पाहा त्याची क्षमता