तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेने शटडाऊनदरम्यान पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरुस्तीवर भर दिला
- Guru Aditya Rajyoga 2025 : गुरु आणि सूर्याच्या महामिलनाने नशिब चमकणार! ‘या’ महिन्यात 5 राशींच्या जीवनात येणार पैसा, यश आणि भरभराट
- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ! गणिताच्या पेपरमध्ये निम्मे पर्याय चुकीचे, विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत वाया
- कर्जतच्या नगराध्यक्षपदी घुले की शेलार? अचानक तिसऱ्या नावाचीही होऊ शकते निवड; आज होणार फैसला
- शिर्डी नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात खास सुरक्षा पथक तैनात