तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- आधार अपडेटसाठी नवे नियम लागू! आता नाव, फोटो, पत्ता बदलण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे
- सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मागे पडला, भारताच्या ‘या’ नवख्या खेळाडूने कसोटीत केला अनोखा विक्रम!
- FD पेक्षा अधिक परतावा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल 8.20% ने व्याज, महिन्याला करा बक्कळ कमाई
- अहिल्यानगर शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलची मागणी, शहर पोलीस उपाधीक्षकांना निवेदन
- संगनेरमध्ये घरकुल बांधकामासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं, पोलिसांत गुन्हा दाखल