लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे.
राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच ज्या भागात अशा प्लास्टिक पिशव्या सापडतील अशा पोलीस ठाण्याचे प्रमुख, नागरी अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी, दंडाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटलेले होते.
यानंतर रविवार (१ सप्टेंबर)पासून ही बंदी लागू करण्यात आलेली असून, बंदी असतानाही कुणी वापर करत असल्यास याची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपली नावे गुपीत ठेवली जातील. यासाठी लखनौ पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.
- Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि कुटुंबासह शनी चरणी
- ह्या कारणामुळे झालं माझं वाटोळे ! सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्यात संगळंच सांगितलं…
- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, उत्तर महाराष्ट्रातील अनेक स्थानकावर घेणार थांबा
- नवी मुंबईतील ‘या’ भागात फक्त 25 लाखात घर मिळणार, सिडकोकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार, कधी निघणार जाहिरात? वाचा….
- अहिल्यानगरच्या डॉ. सौरभ हराळ यांना आंतरराष्ट्रीय यंग रिसर्चर पुरस्कार डोळ्यांच्या ॲलर्जीवरील नवीन उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी सन्मान