लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे.
राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच ज्या भागात अशा प्लास्टिक पिशव्या सापडतील अशा पोलीस ठाण्याचे प्रमुख, नागरी अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी, दंडाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटलेले होते.
यानंतर रविवार (१ सप्टेंबर)पासून ही बंदी लागू करण्यात आलेली असून, बंदी असतानाही कुणी वापर करत असल्यास याची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपली नावे गुपीत ठेवली जातील. यासाठी लखनौ पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.
- .…तर वाहनांना टोल नाक्याच्या पुढे जाताच येणार नाही ! टोल वसुलीबाबत केंद्राचा नवा निर्णय कसा असणार ?
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांना टीईटी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट, वाचा सविस्तर
- ब्रेकिंग ! सोमवारी पुणे शहरातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; शाळा-कॉलेजसला पण सुट्टी
- पुणे ते सातारा प्रवास होणार वेगवान ! ‘या’ घाटातील 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात, वाचा सविस्तर
- महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज ! ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार रक्कम













