नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्याने शेतातील पीक वाया गेले आहे.

त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपच्या सह्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
- मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा आता ‘या’ जिल्ह्यापर्यंत विस्तार होणार ! कसा असणार 21 हजार 670 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?
- महागडं पॉलिश विसरा! घरातील लाकडी दरवाजाला ‘या’ 1 चमचा तेलाने येईल नव्यासारखी चमक, जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 5 जुलैला चालवली जाणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘ह्या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- पैसे कमावायचे असतील तर श्रीमंत लोकांच्या ‘या’ सवयी आजच अंगीकारा; आयुष्य बदलून जाईल!
- पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?