नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्याने शेतातील पीक वाया गेले आहे.

त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपच्या सह्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
- गुलछडीच्या फुलांचा दरवळ; अर्ध्या एकर शेतीतून अहिल्यानगरचा शेतकरी कमवतोय लाखो रुपये!
- बैलगाडा शर्यत पाहायला गेला अन् जीवला मुकला शर्यतीचा मार्ग भरकटलेल्या बैलाच्या धडकेने एकाचा मृत्यू
- आला रे आला….! राहाता तालुक्यात बिबट्यापाठोपाठ सिंहाचा वावर? वनविभागाकडून याबाबत प्रश्नचिन्ह: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर लगेच ‘ही’ 5 कामे करा, देवी लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न होऊन देतील शुभ आशीर्वाद!
- शहरात घरफोड्या करणारी धुळे जिल्ह्यातील चौघे जेरबंद