जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत.
चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले.

तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा गावभेट दौरा करत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रत्येक गावात लावलेल्या विकासाच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, या भागातून ऊसतोड करण्यासाठी जाताना कामगार दिसतात.मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की, कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही.
तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा मंत्र्यांनी कधी प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
- म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
- तुमच्या मालकी जमिनीवर विजेचा खांब गाडलेला असेल तर मोबदला मिळणार का ? कायदा काय सांगतो ?
- इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी गोड बातमी ! लाँच होणार ‘या’ 5 नवीन Electric Cars
- रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर













