जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत.
चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले.

तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा गावभेट दौरा करत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रत्येक गावात लावलेल्या विकासाच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, या भागातून ऊसतोड करण्यासाठी जाताना कामगार दिसतात.मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की, कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही.
तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा मंत्र्यांनी कधी प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
- पहिल्याच दिवशी ‘हा’ IPO 19% सबस्क्राईब! गुंतवणूकदारांची मोठीच क्रेझ… ग्रे मार्केटमध्ये उसळी
- सुझलॉन एनर्जीचे शेअर्स घसरले, ब्रोकरेजने रेटिंग आणि टार्गेट किंमत का कमी केली? गुंतवणूकदार चिंतेत
- सोमवारपर्यंत 1 शेअर्स घ्या आणि मिळवा 4 बोनस शेअर्स! बघा ‘या’ कंपनीचा धमाका
- अहिल्यानगर जिल्ह्यात १४ महिन्यांत ३४९० बाळांचा झाला जन्म, अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या दोन नवजात बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया
- मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर