जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत.
चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले.

तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा गावभेट दौरा करत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रत्येक गावात लावलेल्या विकासाच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, या भागातून ऊसतोड करण्यासाठी जाताना कामगार दिसतात.मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की, कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही.
तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा मंत्र्यांनी कधी प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
- Post Office च्या 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2,00,000 गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- BCA ला ऍडमिशन घेताय ? ‘ही’ आहेत भारतातील टॉप 5 बीसीए कॉलेजेस !
- पुणे, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन महामार्ग प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी 6250 कोटी रुपयांची निविदा जाहीर
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पेन्शन योजनेत झाला पुन्हा मोठा बदल, वाचा डिटेल्स
- संगमनेर तालुक्यात काही जण दांडगाई करत आहेत, त्यांना ठामपणे उत्तर देऊ, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा इशारा