नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत आज होणार अंतिम फैसला ! काँग्रेसच्या पत्राची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी ! शाळांना सलग 5 दिवस सुट्टी, कारण….
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात महत्वाचा शासन निर्णय !
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना येत्या 12 महिन्यात 78 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार ! तज्ञांनी सुचवलेत ‘हे’ 5 शेअर्स
- ब्रेकिंग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, वाचा सविस्तर













