नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













