नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- महाराष्ट्रातील 3 मोठ्या जिल्ह्यांचे स्वप्न भंगणार ! राज्यातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प रद्द होणार, DCM अजित पवारांचा गौप्यस्फोट
- General Knowledge : भारतातील पहिले विमानतळ आपल्या महाराष्ट्रात, ‘या’ शहराला मिळालाय पहिल्या विमानतळाचा मान !
- TMB Bharti 2025: तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत 124 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- DeepSeek-R1 सह लॉन्च होणार हा स्मार्टफोन ! AI-पॉवर्ड असिस्टंट, 50 MP कॅमेरा, JBL साउंडसह मोठी बॅटरी
- मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरु होणार ताशी 1100 किलोमीटर वेगाने धावणारी ‘ही’ ट्रेन, Mumbai-Pune प्रवासासाठी किती मिनिट लागणार ?