संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी पती, पत्नी व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी विमल बाळचंद आहेर ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सुभाष नरहरी आहेर, अनिता सुभाष आहेर व सतिश सुभाष आहेर यांना म्हणाली की, तुम्ही विनाकारण शिवीगाळ करू नका.

तुमचा भाऊ आल्यानंतर या. याचा राग आल्याने वरील तिघांनीही महिलेसह तिचा पती व मुलगा या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण क रत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विमल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हादाखल केला आहे.
- भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway
- 1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मार्चमध्ये होळीपासून ईदपर्यंत शाळांना सलग सुट्ट्या School Holiday
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…