तांदूळवाडी : राहुरी नगरपालीका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकास पर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती.
यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली अथवा सुरू आहेत. याचे आत्मपरीक्षण करून तनपुरे यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान देतानाच निष्क्रिय कोण आहे. हे राहुरीतील जनतेला ठाऊक असल्याचीटीका राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी केली.

राहुरी शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना चाचा तनपुरे पुढे म्हणाले, की नगराध्यक्ष तनपुरे यांनी २०१६ च्या राहुरी नगरपालिका निवडणुकीत मोठा गाजावाजा करून ग्राफिक्स व्हिडिओद्वारे राहुरी शहरातील जनतेला विकास पर्वाची अनेक स्वप्न दाखविली होती.
शहराला स्मार्ट सिटी करण्याची ग्वाही त्यांनी त्यावेळी दिली होती. मात्र आजची शहराची अवस्था पाहिली, तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यू, चिकणगुन्या यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, मताच्या राजकारणासाठी तनपुरे यांनी विकासाचा बोजवारा केला आहे.
- सिबिल स्कोअरमुळे बँक नाकारत आहेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज, बँकेवर FIR दाखल करण्याच्या फडणवीसांच्या आदेशाला मात्र केराची टोपली
- तब्बल 30 वर्षानंतर तयार होणार शुभ योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत लाभ
- भंडारदऱ्यातील निकृष्ट रस्त्यांचा काजवा महोत्सवाला फटका, निकृष्ट रस्त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगार धोक्यात
- ‘ही’ आहेत मुंबईतील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे तुमचं करिअर सेट
- पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर फ्लायओव्हर ! पुढल्या महिन्यात लोकार्पण होणार