कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे.
मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या कर्जत येथील सभेत बोलताना पवार यांनी भाजप-सेना युती सरकारच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.

सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस असूनही सभेला चांगली गर्दी होती. ते पुढे म्हणाले की, खोटं बोला परंतु रेटून बोला, यातच भाजप-सेना युतीचे नेते पटाईत आहेत. पाच वर्षांत युती सरकारकडून कुठल्याच प्रकारची प्रभावी कामे झाली नाहीत, कुठलीच आश्वासने सरकारने पाळली नाहीत.
भाजप-सेना युती सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही. ना कर्जमाफी, ना पीकविमा, ना कुठल्याच शेतीमालाला हमीभाव. युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्या युती सरकारला मते मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













