कर्जत : ‘मी राज्याचा भूमिपुत्र असून, कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे. म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे. जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे हमखास विजय मिळवणार असा विश्वास मला आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केले.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पवार यांनी कर्जत शहरातून भव्य रॅली काढली. त्यात युवकांची मोठी संख्या होती. रॅली संपल्यावर रणरणत्या उन्हातही प्रचारसभा घेण्यात आली. या वेळी बाळूमामा यांचे वंशज उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘कर्जत व जामखेड मतदारसंघातील सर्व जनतेच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथील जनतेला त्यांच्या हक्काचा, त्याच्यांसोबत राहून सर्व प्रश्न आणि समस्या समजून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जाणारा लोकप्रतिनिधी हवा आहे.
मी या राज्याचा भूमिपुत्र आहे. या मतदारसंघाशी माझे पुर्वजन्मीचे काहीतरी घट्ट नाते असावे. यामुळेच मी येथे उभा आहे. १० वर्षांत राम शिंदे यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. ठरावीक मंडळींना हाताशी धरून राजकारण करणे एवढेच त्यांनी केले.
आता असे काय घडले की, गायब झालेले मंत्री तीन महिन्यांपासून मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत?’ ‘देशातील भाजप सरकार प्रत्येक राजकीय नेत्याला ईडीचे हत्यार काढून घाबरवून सोडत होते. तसा प्रयत्न त्यांनी शरद पवार यांच्याबाबतही केला.
मात्र, पवार साहेबांनी ईडीला शिंगावर घेतले. ईडी घाबरून पुढे पळत होती आणि शरद पवार मागे पळत होते. हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे.
- ब्रेकिंग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, वाचा सविस्तर
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 5 आजाराच्या उपचारासाठी मिळणार दीड लाख रुपयांची मदत
- पुढील आठवड्यात शेअर मार्केट मधील ‘या’ 5 कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश वितरित करणार !
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ; निवडणुक आयोगाकडे काँग्रेसच्या तक्रारीनंतरही मकर संक्रांतीला पैसे मिळणार, CM फडणवीस म्हणतात….
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘या’ 2 भत्त्यात झाली मोठी वाढ!













