श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे.
श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. त्यांनी नागवडे आणि पाचपुते हे समाजाच्या कल्याणासाठी एकत्र आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते पाण्याबाबत काय म्हणाले होते याची आठवण आहे का? असे विचारत अजित पवार यांना टोला मारत पाण्याची मागणी केल्यावर केलेल्या मावळच्या गोळी बाराची आठवण करून दिली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ मुक्त होत असल्याने सांगितले यावेळी आमदार सुरेश धस, खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींची भाषण झाले.
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा
- मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांवर कडक निर्बंध लागू













