जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर काही महिलांसह १४ जण बेशुध्द पडले. या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलवरचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश मीणा यांनी मंगळवारी दिली.
बाबा मोहनदास यांच्या यात्रेत आलेल्या १५ भाविकांनी एका स्टॉलवर चहा पिला होता. त्यानंतर आपल्याला बेशुध्दी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना भिवाडीच्या सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

त्यापैकी आठ जणांना बाहेर पाठवण्यात आले आहे. या भाविकांनी अफूमिश्रित चहा प्यायल्याने ते बेशुध्द पडले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असून चहाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
यात्रेत राजस्थानशिवाय हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
- लाडक्या बहिणींना मिळाला मोठा दिलासा , आता या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करता येणार ! केवायसीच्या नियमात पण झाला बदल
- पीएम किसानच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांचे 2,000 रुपये कायमचे बंद होणार, कारण काय?
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! पुढचा हप्ता 1500 चा नाही तर 4500 चा मिळणार, वाचा डिटेल्स
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहराला मिळणार दोन नवीन मेट्रो मार्ग, महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता
- आठव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता पण वाढणार का ? वाचा सविस्तर













