कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते.
मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी ठिकाणी काळे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्म भरून देखील पाणी मिळाले नाही. गावतळे भरून मिळावे यासाठी शेतकरी पोळ्याच्या सणाच्या दिवशी तहसीलसमोर उपोषण करीत होते.
दसऱ्याच्या दिवशीही शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून उपोषणाला बसले होते, तर चांदेकसारेचे शेतकरी दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून जिवंतपणी सरणावर बसले होते, असे काळे म्हणाले.
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ; ‘ही’ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देणार एका शेअरवर 4 मोफत शेअर्स
- केंद्र सरकारची भन्नाट योजना ! ‘या’ लोकांना बिजनेस उभारण्यासाठी मिळणार 300000 रुपये
- मकर संक्रांति आधीच लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता करणेबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा
- भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार ! कसा असणार 89 किलोमीटरचा रूट ? तिकीट फक्त 5 रुपयांपासून सुरु
- 8व्या वेतन आयोगा आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार ! 2026 मध्ये पगारात किती वाढ होणार ?













